कपार
किती दावे केलेस आणि मी
किती दुवे जोडले
तरी काळाच्या अपार कपारीत
कोंडून तू निघून गेलास
शुष्क रेताड माझ्या मनात
कधी पालवी फुटू नये
असा तू प्रण केला होतास कि
काय मला माहित नाही
पण तुझ्या जाण्यानंतर हिरवाईने
माझ्यात ठाण मांडलं कि रे...
वैराण उक्ती हि विराणी
झाली...
चिरा आणि भेगा हि शोभा
आणतात आताशा
वेदनेचं सेलिब्रेशन करावं
तसं...
उणीवेच्या तिजोऱ्या
भराव्यात तसं....
अनंताचा प्रवास यापेक्षा
वेगळा काय असतो ?
--- समिधा